Home Blog

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

चेतना इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला

संपादकीय ,

चेतना इंटरनॅशनल स्कूल सरडेवाडी येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार माने सर संस्थेच्या सदस्य व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमा आयोजित करण्यात आला. नर्सरी पासून बारावीपर्यंतची विद्यार्थी तसेच चेतना कॉलेजचे प्राचार्य व सर्व शिक्षक स्टाफ यावेळी उत्साहाने उपस्थित होते यावेळी युवराज शिंदे सर यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व इतिहास थोडक्यात सांगितला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड तानाजी देवकर साहेब यांनी कामगार दिनाचे महत्त्व तसेच महाराष्ट्र दिन आणि सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचे कौतुक केले त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा या विषयी माहिती दिली तसेच प्राचार्य मस्के सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि शिक्षकांना सूचना केल्या व शिक्षकांचे कौतुक केले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यास माधुरी चव्हाण मॅडम आणि पोर्णिमा थोरे मॅडम यांनी मदत केली आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले आणि सूत्रसंचालन गोळे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रांजली सुतार मॅडम यांनी केले

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

बारामती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव,’एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते.

 

यावेळी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, नगरसेवक, पत्रकार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखंड हिंदुराष्ट्र निर्माण पद यात्रेचे निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने यात्रेला नाकारल्यामुळे सर्व साधुसंत आखाड्यावरील नाथ भक्त इंदापूर, जिल्हा पुणे येथून आक्रमक…

अखंड हिंदुराष्ट्र निर्माण पद यात्रेचे निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकारने यात्रेला नाकारल्यामुळे सर्व साधुसंत आखाड्यावरील नाथ भक्त इंदापूर जिल्हा पुणे येथून आक्रमक…

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्यास २४ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

संपादकीय,

पुणे, दि. १७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी-2026) ऑनलाइन आवेदन पत्र भरण्यास २४ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविली आहे.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या डी- फार्मसी अभ्यासक्रम प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या डी- फार्मसी अभ्यासक्रम प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न

संपादकीय,

चेतना फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, येथे द्वितीय वर्ष डी-फार्मसी विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रास्ताविका मध्ये कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. निरोप समारंभ हा केवळ निरोप देण्याचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, कविता व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून वातावरण उत्साहपूर्ण केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमधील अनुभव, आठवणी आणि भावना व्यक्त करताना आपले मनोगत मांडले, ज्यामुळे सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रामाणिकपणा, सेवा भाव आणि नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले. “फार्मसी क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून मानव सेवेचे माध्यम आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आरोग्यासाठी करा,” असे ते म्हणाले.

तसेच वर्गशिक्षिका प्रा. तनुजा काशीद, डीन अकॅडमिक्स प्रा. गीतांजली कांबळे आणि प्रा. चिंतामणी रणवरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन आकर्षक पद्धतीने पार पडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट आयोजन प्रा. प्राजक्ता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष डी-फार्मसी विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्या परिश्रमा मुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

संस्थेचे खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने सर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देताना, कॉलेजमध्ये मिळवलेले ज्ञान, अनुभव आणि मैत्री हीच त्यांच्या आयुष्यभराची अमूल्य संपत्ती असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी आठवणींचा ठेवा निर्माण करून गेला.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर’च्या सहकार्याने पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर’च्या सहकार्याने पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्न

संपादकीय,

इंदापूर: येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर यांच्या सहकार्याने पूल कॅम्पस ड्राइव्ह – २०२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले।

या पूल कॅम्पस ड्राइव्हचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर टीम तसेच पूल कॅम्पस ड्राइव्हसाठी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर चेतना फाउंडेशनचे खजिनदार सोमनाथ माने सर यांनीही उपस्थितांना संबोधित करत शुभेच्छा दिल्या. पुढे वेलनेस फॉरएव्हरच्या मयूर डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस ड्राइव्ह बाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मिलिंद कवितके, अश्विनी कवितके, आणि रोहित उराडे (वेलनेस फॉरएव्हर, इंदापूर शाखा) हे उपस्थित होते।

तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के, विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश सोनवणे, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. प्राजक्ता गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।

या उपक्रमामध्ये डी.फार्म व बी.फार्म विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थी फार्मासिस्ट व वैद्यकीय प्रतिनिधी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. निवड प्रक्रिया समूहचर्चा व मानव संसाधन मुलाखत या टप्प्यांद्वारे पार पडली।

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये जवळील विविध फार्मसी महाविद्यालयांमधून एकूण १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी ३ विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट पदासाठी निवड करण्यात आली असून त्यांना वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर यांच्याकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे।

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी व आवश्यक कौशल्यां बाबत मार्गदर्शन मिळाले।

प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी विद्यार्थ्यांना अशा संधींचा लाभ घेऊन आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करण्याचे आवाहन केले।

या स्तुत्य उपक्रमास चेतना फाऊंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने व सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रुचिता भंडारी यांनी केले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संपादकीय,

इंदापूर: येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.फार्मसी च्या विद्यार्थिनी सुप्रिया पांढरे आणि राजनंदिनी गंगावणे यांनी प्रभावीपणे पार पाडले.

कार्यक्रमात सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर प्रा. स्वप्निल पाटील सर यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून समानतेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. पुढे प्रा. किरण सातपुते सर यांनी विद्यार्थ्यांना महान व्यक्तींचे विचार आचरणात आणण्याचे, शिक्षण, कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवण्याचे तसेच समतामूलक समाज घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यानंतर प्रा. अस्मिता चव्हाण मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवास व संघर्षाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अकॅडमिक डीन प्रा. गीतांजली कांबळे मॅडम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, या दोन्ही महान व्यक्तींचा समान उद्देश म्हणजे शिक्षणाचा प्रसार हा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण सर्वांनी या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम वर्ष बी.फार्मसी विद्यार्थिनी वेदिका शिंदे हिने केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सोशल अँड एक्स्टेंशन अ‍ॅक्टिव्हिटी विभागामार्फत करण्यात आले असून या विभागाचे प्रभारी प्रा. किरण सातपुते आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सामाजिक सहभागाच्या दृष्टीने NSS संबंधित उपक्रमांचाही समावेश करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन भविष्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज:- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज:- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

संपादकीय,

पुणे : कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या उत्पादनाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देत कृषी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार (ता. १३) रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी शेतीत तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे, अनिल महामुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

आपल्या भाषणात श्री.भरणे म्हणाले की, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब आशादायी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असल्याचे नमूद केले. योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते; मात्र पावसाअभावी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभाग आणि शेतकरी यांचे अतूट नाते असल्याचे सांगताना भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. “शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतात. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली पाहिजे,” असे ते म्हणाले. स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा प्रवास हा संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे सांगितले.

दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे अभिवादन

संपादकीय,

पुणे, दि.१४: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार स्मिता माने, सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक तसेच भाग घेणाऱ्या स्पर्धकांना मिळणार प्रशस्तीपत्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धा

विजेत्यांना पारितोषिक तसेच भाग घेणाऱ्या स्पर्धकांना मिळणार प्रशस्तीपत्र

 

मुंबई, १४ एप्रिल —

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभातजी लोढा यांनी सांगितले.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य,समता, बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य केवळ एका निबंधात मांडणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य महिला साक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर ही निबंध स्पर्धा होणार आहे.

 

*स्पर्धेचे स्वरूप*

या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खाजगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तर विषयासाठी विद्यार्थ्यांना५००ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतात या गटाला ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमांकाशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या नोंदणीसाठी क्यू आर कोड ही देण्यात आला आहे. नोंदणी केल्यावर स्पर्धकांना त्याची पोच ही मिळणार आहे.

या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र ही दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

error: Content is protected !!